आसामला पुराचा तडाखा !   

६६ जणांचा मृत्यू; २३ लाख जण संकटात

गुवाहाटी : आसाममध्ये पुरामुळे मोठे नुकसान झाले असून आतापर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. २८ जिल्ह्यांतील २३ लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. त्यांना घरे सोडण्यास भाग पाडले जात आहे.
 
सततच्या पावसामुळे बहुतेक नद्यांची पाणी पातळी धोक्याच्या पातळीच्या वर आहे.  निमातीघाट, तेजपूर आणि धुबरी येथे ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. त्यामुळे धुबरीला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. तेथील ७ लाखांवर नागरिक संकटात सापडले आहेत.  कछारमधील १ लाख ७७ हजार ९२८ आणि बारपेटातील १ लाख ३४ हजार ३२८ नागरिकांना घर सोडावे लागले.
 
या वर्षी पूर, दरड कोसळणे आणि वादळांमुळे एकूण ७८ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी ६६ जणांचा मृत्यू केवळ पुरामुळे झाला आहे. एकूण ५३ हजार ६८९ जणांनी २६९ मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे,  मदत छावण्यांमध्ये जीवनावश्यक साहित्य पुरवण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतीच कछार जिल्ह्यातील फुलर्टल येथील पूर मदत शिबिराला भेट दिली होती. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमाी म्हणाले, ’पूर मदत छावण्यांची सुरक्षा आणि स्वच्छता ही सरकारची प्राथमिकता आहे आणि माझी पथके नागरिकांपर्यंत मदत पोहोचवत आहेत. २८ जिल्ह्यांमधील ३ हजार ४४६ गावांमधील सुमारे २३ लाख जणांना पुराचा मोठा फटका बसला आहे, तर पुराच्या दुसर्‍या लाटेत ६८ लाख ४३२ हजार ७५ हेक्टर पीक जमीन पाण्याखाली गेली आहे.७० जणांचे प्राण वाचले. गेल्या २४ तासांत विविध संस्थांनी एकूण ७० जणांचे आणि ४५९ गुरांना वाचवले आहे. राज्यभरातून रस्ते, पूल, अंगणवाडी केंद्रे आणि मत्स्यपालन तलावांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

Related Articles